व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Weight loss ayurvedic formula :पाहा पोटाची चरबी कमी करण्याचा आयुर्वेदिक उपाय, तज्ज्ञांचा उत्तम फॉर्म्युला

By Rohit K

Published on:

Weight loss ayurvedic formula

Weight loss ayurvedic formula : पाहा पोटाची चरबी कमी करण्याचा आयुर्वेदिक उपाय, तज्ज्ञांचा उत्तम फॉर्म्युला

Weight loss ayurvedic formula: सणासुदीच्या काळात वजन कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांचा लाभ

सणांचा हंगाम जवळ आल्याने प्रत्येकजण आपल्या आरोग्याबद्दल सजग होतो. गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये चांगलं दिसण्याचं स्वप्न सर्वांचं असतं. त्यामुळे आहारावर आणि व्यायामावर भर देऊनही काहींचं वजन कमी होत नाही. अशा वेळी आयुर्वेदातील एक प्रभावी उपाय (Weight loss ayurvedic formula) सांगितला जातो – आंब्याच्या पानांचा वापर.

आणखी पाहा:Diet For Weight Gain : किती बारीक आहेस तू , असे टोमणे मारतात लोक? ‘हे’ फळ खा पोटभर, खिशालाही परवडेल सहज

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आंब्याच्या पानांमधील औषधी गुणधर्म

आंब्याच्या पानांमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल, आणि टेरपेनॉइड्स सारख्या घटकांमुळे या पानांचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत. आंब्याच्या पानांचा अर्क शरीरातील चरबीच्या चयापचयात हस्तक्षेप करून वजन कमी करण्यास मदत करतो. अनेक प्राण्यांवर केलेल्या अभ्यासांत आढळलंय की हे पान चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर आंब्याच्या पानांचा चहा वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

आहारात आंब्याच्या पानांचा वापर कसा करावा? (Weight loss ayurvedic formula)

1)वजन कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांचा चहा

आंब्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी, 2-3 पानं 2 कप पाण्यात उकळा. हे मिश्रण निम्मं झाल्यावर ते गाळून घ्या आणि थोडा मध किंवा लिंबाचा रस घालून सेवन करा. हा चहा चयापचय सुधारण्यास मदत करतो आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करतो.

2)सूप आणि भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये आंब्याच्या पानांचा समावेश

ताजी आंब्याची पानं सूप किंवा भाज्यांच्या ग्रेव्हीत टाकून सेवन केल्यास पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच, या पानांची पावडर बनवून ती सूप किंवा पेयांमध्ये मिसळून पिणं फायदेशीर ठरू शकतं.

आंब्याच्या पानांचा फॉर्म्युला – स्थूलतेवर आणि मधुमेहावर उपाय(Weight loss ayurvedic formula)

आंब्याच्या पानांचा अर्क मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. या पानांमध्ये असलेली संयुगे शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि चयापचय क्रिया सुधारतात. त्यामुळे तुमचं वजन कमी होतं आणि तुमची पोटाची चरबी वितळते.

आता तुम्ही सणाच्या हंगामात आंब्याच्या पानांचा वापर करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. हा आयुर्वेदिक फॉर्म्युला तुमचं आरोग्य राखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

Weight loss ayurvedic formula
Weight Loss Ayurvedic Formula

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews